Sunday, June 8, 2025
ताज्या घडामोडी

आमदार आर टी देशमुख यांच्या अपघाती निधनाने जिल्ह्यावर शोककळा पसरलेली असताना गेवराई नजिक कंटेनरने सहा जणांचा चिरडले, सोमवार ठरला अपघात वार 

आमदार आर टी देशमुख यांच्या अपघाती निधनाने जिल्ह्यावर शोककळा पसरलेली असताना गेवराई नजिक कंटेनरने सहा जणांचा चिरडले, सोमवार ठरला अपघात वार 

बीड
    भाजपाचे माजी आमदार आर टी देशमुख यांच्या अपघाती निधनाने जिल्ह्यावर शोककळा पसरलेली असताना मांजरसुंबा, आष्टी आणि रात्री गेवराई पासून जवळच असलेल्या गढी येथे भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अपघातात अनेकांच्या मृत्यूच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवार हा अपघात वार ठरला आहे.
   याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,सोमवारी रात्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर गडी येथील कारखान्यासमोर हायवे रोडवर उड्डाणपुलावर एक एक्स यु व्ही ५०० गाडी दीपक आतकरे रा. गेवराई यांचा मुलगा चालवत असताना तो अंदाज न आल्याने महामार्गावरील डिव्हायडरवर जाऊन छोटासा अपघात झाला होता. सदर अपघातात कोणीही जखमी नव्हते. परंतु डिव्हायडर मध्ये अडकलेली गाडी काढण्याकरिता दीपक आतकरे हे इतर सहकारी यांच्यासह अपघात स्थळी येऊन अपघातग्रस्त वाहन काढत असताना त्या ठिकाणी उभ्या असलेल्या लोकांना भरधाव वेगाने आलेल्या आयशर ट्रक ने चिरडले.
या अपघातात ६ लोक मयत झाले असून एक इसम गंभीर जखमी आहे. मयता मध्ये बाळू आतकरे, भागवत परळकर, सचिन नन्नवरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव आणि दीपक सुरख्या आदींचा समावेश आहे.
   टेम्पोने नंतर घटनास्थळापासून पुढे काही जणांना धडक दिली. यात योगेश शिंदे आणि हेमंत दाभाडे (दोघे रा. गेवराई)
गंभीर जखमी झाले. अपघातानंतर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.
    अपघातातील मयतांच्या कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आसुन
गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर, गेवराई पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव  घेऊन जखमींना मदत करत वाहतूक सुरळीत केली.
    टेम्पोने नंतर घटनास्थळापासून पुढे काही जणांना धडक दिली. यात योगेश शिंदे आणि हेमंत दाभाडे (दोघे रा. गेवराई)
गंभीर जखमी झाले असून अपघातानंतर टेम्पोसह चालक फरार झाला असून  अपघातानंतर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.

    अन् अंगाचा थरकाप उडाला

घटनास्थळावर मदत करण्यासाठी धावलेल्या अनेकांच्या अंगाचा थरकाप उडाला. प्रत्यक्षदर्शीनी पुण्यनगरीशी बोलताना सांगितले की, सदरील अपघात एव्हढा भीषण होता की, रस्त्यावर रक्त अन् मांसाचा अक्षरशः सडा पडला होता. रात्री दीडच्या सुमारास महामार्गावरील साचलेले रक्त साफ करण्यासाठी टँकर मागवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!