प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथा सप्ताहा दरम्यान दोन महिलां व एका पुरुषास गमवावा लागला जीव
प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथा सप्ताहा दरम्यान दोन महिलां व एका पुरुषास गमवावा लागला जीव
बीड
(प्रतिनिधी)-
कथेला झालेली प्रचंड गर्दी, नियोजनाचा अभाव, भक्तांची जागा मिळवण्यासाठी कसरत व इतर कारणांनी कायम चर्चेत राहिलेल्या प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथा सप्ताहा दरम्यान दोन महिलां व एका पुरुषास आपला जीव गमवावा लागल्याचे आता समोर आले आहे.
बीडच्या चाकरवाडीमध्ये प्रदीप मिश्रांच्या शिवपुराणकथेचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता आज शनिवारी झाली. प्रदीप मिश्रांची कथा म्हणजे लाखोंची गर्दी हे माहित असतानाही चाकरवाडीमध्ये आयोजका कडून त्या तुलनेत नियोजना मध्ये कसर होती.
त्यातच आता कथा ऐकण्यासाठी आलेल्या दोन महिला व एक पुरुषास आपला जीव गमवावा लागल्याचे समोर आले
कथेच्या ठिकाणी आपल्याच मर्जीतल्या लोकांचा भरणा होऊ लागल्याने नियोजन सातत्याने कोलमडत होते. त्यातच आता कथेच्या दरम्यान कथा ऐकण्यासाठी आलेल्या दोन महिलांना व एका पुरुषास आपला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. यामुळे कथेच्या आयोजनाला कुठेतरी गालबोट लागल्याचे बोलले जात आहे. कथेच्या पहिल्याच दिवशी कथा ऐकण्यासाठी आलेल्या चंद्रकला पांडुरंग बंडे (वय-६५ रा. मानवत, जि. परभणी) या महिलेचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला असल्याचे सांगितले जाते. मात्र ही माहिती बऱ्यापैकी लपविली गेली. तर कथेच्या शेवटच्या दिवशी कथा ऐकून परत निघालेल्या लक्ष्मीबाई बलभीम उकळे (वय-५५, रा. धारूर) या महिलेला भरधाव रुग्णवाहिकेने (MH.44.U.4444) ने चाकरवाडी परिसरातच उडविले. यात त्या महिलेचा जागीच मृत्यु झाला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत असून थोड्यावेळात पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तर दिनांक 12 जून रोजी कथा ऐकावयास गेलेले बीड तालुक्यातील पिंपळादेवी या छोट्याशा गावातील अत्यंत गरीब कुटुंबातील व मंदिराची पूजाअर्चा करून उपजीविका भागवणारे वसंत लक्ष्मण साबळे हे आपल्या गावातील सहकार्यासोबत चाकरवाडी येथे गेले असता वाहनाची पार्किंग चार किलोमीटर पेक्षाही जास्त दूर असल्याकारणाने ही सर्व मंडळी वाहन पार्किंग करून पायी चालत जात असतानाच रस्त्यावरील गर्दी मध्ये वसंत साबळे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व ते खाली कोसळले यावेळी लागलीस त्यांच्या सहकाऱ्यांनी साबळे यांना परत आपल्या वाहनातून बीड येथील रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. दरम्यान कथा सप्तहा दरम्यान झालेले हे भक्तांचे तीन जणांचे मृत्यु नियोजनावर अनेक प्रश्न निर्माण ठरले आहेत.
याशिवाय कथेच्या सात दिवसाच्या कालावधीत जमलेल्या अलोट गर्दीचा फायदा घेऊन काही चोरट्यांनी महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या अनेक घटना घडल्या आणि हाही कथेतील चर्चेचा मुद्दा झाला.
