ताज्या घडामोडी

बीडमध्ये बालविवाहाची भयंकर घटना. एका दिवसांत १३ वर्षांच्या मुलीचं दोन वेळा लग्न, 22 जणाविरुद्ध गुन्हा दाखल

बीडमध्ये बालविवाहाची भयंकर घटना. एका दिवसांत १३ वर्षांच्या मुलीचं दोन वेळा लग्न, 22 जणाविरुद्ध गुन्हा दाखल 

 बीड

    बीडच्या शिवाजीनगर भागात बालविवाहाची भयंकर घटना घडली असून  एका दिवसांत १३ वर्षांच्या मुलीचं दोन वेळा लग्न लावण्यात आलं असून ही मुलगी पाचवीमध्ये शिकते. सामाजिक संस्थांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी हा बालविवाहाचा डाव उधळवून लावला असून या प्रकरणी 22 जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   मुलीचं लग्न ज्या व्यक्तीसोबत लावून देण्यात आलं ती व्यक्ती ३० ते ३५ वर्षांची आहे. या व्यक्तीच्या बायकोला ही गोष्ट कळताच तिने याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर ही व्यक्ती पळून गेली. त्यानंतर या मुलीचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून देण्यात आलं. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली. याप्रकरणी २२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नानंतर या मुलीचा पहिला नवरा पळून गेला. तर दुसऱ्या नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या मुलीच्या बालविवाह प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात काझीसह तब्बल २२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा सर्व प्रकार शाहूनगर परिसरात घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. फरार झालेल्या पहिल्या नवऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

बीडच्या शिवाजीनगर भागामध्ये राहणाऱ्या आणि पाचवीमध्ये शिकणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीचे दोन वेळा लग्न झाले. ही मुलगी सोमवारपासून सहावीच्या वर्गात जाण्यासाठी तयारी करत होती. पण त्यापूर्वीच तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईने तिचे लग्न लावून दिले. या मुलीच्या आईने तिचे लग्न अगोदरच दोन लग्न झालेला आणि दोन मुलांचा बाप असलेल्या एका व्यक्तीशी लावून दिले. शाहूनगरमध्ये गुरूवारी घरातच हे लग्न पार पडलं. लग्नानंतर दोघांचे फोटोही काढण्यात आले होते.

   या लग्नाबाबत त्या व्यक्तीच्या बायकोला कळाले तेव्हा तिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस कारवाई करतील या भीतीने ही व्यक्ती पळून गेली. त्याने आपल्या बहिणीच्या गावामध्ये राहणाऱ्या एका मुलाचे या मुलीसोबत लग्न लावण्यास सांगितले. त्याप्रमाणे एका दिवसांत या मुलीचे दुसरं लग्न लावण्यात आलं आणि त्यांचे फोटोही काढण्यात आले. लग्न झाल्यानंतर हा मुलगा नवरी मुलीला घेऊन जात होता तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतलं. बालविवाह प्रतिबंधक कायद्याचा भंग झाल्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे. याप्रकरणी २२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!